आपण दूर राहातो पण एकत्र असतो, शब्द ऐकतो पण मन मोडतो, भक्ती आणि श्रद्धा यातले फरक तोलतो आणि जोडतो देखिल. रोजच्या सच्च्या आणि रसरशीत जीवनात आपण कोरडे का होतो बर? कदाचित आपल्या जाणीवा कामात इतक्या गुंतून गेल्या असतात कि काही सांगावंसं वाटाण राहून जातं.
कामात गुंताण्यातला आनंद, संवेदना खोलवर जाण्यातला आनंद, झपूर्झा लागण, खोलवर बुडण्यातला आनंद, काही नसण्यमधला देखील आनंद आणि असण्यमधला देखील!
किती तरी कविता आपल्या संवेदनशील मनाला आपल्या भाषेचा सुगंध त्यातल्या शब्दामधून दूर दूर वर पोहोचवतात.
अशी एक कविता जरी जगातली सुखदुख्ख बदलली असली तरीही चिरकाळ वाटते, म्हणून लिहिली
हर्ष खेद ते मावळले,
हास्य निमाले / अश्रु पळाले;
कण्टकशल्ये बोथटली / मखमालीची लव वठली;
काही न दिसे दृष्टीला
हास्य निमाले / अश्रु पळाले;
कण्टकशल्ये बोथटली / मखमालीची लव वठली;
काही न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला / तिमिर हरपला;
काय म्हणावे या स्थितिला?
झपूर्झा! गडे झपूर्झा !
काय म्हणावे या स्थितिला?
झपूर्झा! गडे झपूर्झा !
कवी - केशवसूत
No comments:
Post a Comment